रविवार, २५ डिसेंबर, २०२२

नवरंग



Courtesy:Unsplash.. Mohammed Shamma

दरवर्षी येणाऱ्या नववर्षाकडे बघून मनात विचारांची भाऊगर्दी होते...मागे वळून बघताना आठवतात ..गेल्या वर्षी केलेले नानाविध संकल्प.. मात्र काळाच्या ओघात ते धुसर होत जातात ..व पुन्हा कधी नवीन संकल्प करण्याची वेळ येते..ते आपलं आपल्यालाच कळत नाही..जुन्या व नव्या संकल्पादरम्यान होतात..आपल्या हातून कळत-नकळत असंख्य चुका..

 यश-अपयश ..उत्साह- निराशा ..विश्वास-विश्वासघात..प्रेम- द्वेष ..आपले-परके..डाव-प्रतिडाव..अशा दोन ध्रुवांदरम्यान डोलत असतो..आपण.. दोलकासारखे.. सबंध वर्षभर.. कधी या तीरावर तर कधी त्या ..

परंतु एकंदरीत गोळाबेरीज केली असता, यापेक्षा आणखी चांगलं जगता आलं असतं..अशी हुरहुर मनात दाटून येते..हे मात्र नक्की ..


प्रत्येक वर्ष आपल्याला अनुभवाची नवी शिदोरी देऊन जातं..परंतु आपली भुक कायमच वाढत असल्याने.. तृप्तीची ढेकर आपण देऊ शकत नाही. ..


कुणी किती पैसा कमावला यापेक्षा त्याने किती माणसं कमावली, हे महत्वाचे नाही काय ?माणसे मोठ्या हुद्द्यावर गेली की त्यांची जमिनीशी नाळ तुटताना दिसते.. कधीही न संपणाऱ्या शर्यतीत ते धावत असतात अधाशासारखे.. ऊर फाटेस्तोवर.. क्षणाचीही उसंत घेण्याची त्यांना गरज वाटत नाही ..दुसरीकडे उघड्या आकाशाखाली बिनधास्तपणे जगणारी माणसं बघितली की वाटतं ..या दोघांपैकी कोण जास्त सुखी? 

या दोन टोकांच्या आयुष्यांव्यतिरिक्त ,जीवन जगण्याचा मध्यम मार्ग शोधणारीही काही मंडळी असतात.. चौकटीत इमानेइतबारे आयुष्य जगताना, समाजासाठी चार-दोन गोष्टी करता आल्या तर त्यांची त्याला ना नसते ..

रंगीबेरंगी या दुनियेत अशी अनेक रंगी आयुष्य जगणारी माणसं असणारच ..त्यात आपल्याला कसे आयुष्य जगायला आवडेल हा ज्याचा - त्याचा प्रश्न आहे..

 परंतु येणारा प्रत्येक दिवस आनंदाचा व सुखाचा जावो,यापेक्षा जीवनाचा वेगळा अर्थ तो काय? म्हणून वाटतं,येणारे नववर्ष प्रत्येकासाठी,असावे सृजनाचे..नावीन्याचे.. आंतरिक समाधानाचे ....!!

Best of glocal marathi

गनिमीकावा

        गनिमीकावा संकटे बहु येतील, हरणे तुला ठाव नाही.. कोंडीत सापडाया, गड्या तू कुणाचा साव नाही..!!     भेटतील सरडे,      पदोपदी तुला रे.. ...