प्रेम लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
प्रेम लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, ९ सप्टेंबर, २०२०

प्रेम

(Courtesy:Unsplash-Mayur Gala) 

 प्रेम"या दोन अक्षरी शब्दात अद्भूत,अनुपम व निरागस सौंदर्य   दडलेलं आहे.मात्र ते दिसण्याचं नसून असण्याचं असतं, हे कळायला बऱ्याच जणांना उभी हयात कमी पडते,हेही तितकेच खरे!!!

   
(Courtesy:Unsplash-Annie Spratt )
तारुण्यसुलभ वयात जडतं ते गुलाबी,मखमली प्रेम. काही कळण्यासमजण्या पलीकडच्या या वयात असते,एकमेकांविषयी हुरहूर.. ओढ..आकर्षण.कुणाचं असतं अव्यक्त, अबोल,लपूनछपून..तर कुणाचं बोलकं, बिनधास्त,खुलेआम.."डंके की चोट पर"..म्हणतात ना,"प्रेम हे प्रेम असतं, तुमचं नी आमचं सेम असतं",अगदी असंच असतं हे गुलाबी प्रेम.याला प्रेम म्हणावं का??यावर दुमत नक्कीच असू शकेल. पण हे प्रेम न करणारा व सबंध आयुष्य, या प्रेमाचा हळुवारपणा हृदयात न जपणारा जगात शोधूनही सापडायचा नाही!!
     
(Courtesy:Unsplash-Aziz Acharki)

पंचविशी नंतर खऱ्या अर्थाने सुरू होतो ,डोळस..प्रगल्भ.."जिंदगीभर का साथ"..अशा प्रेमाचा शोध.शोधच तो!!कारण कुणी शोधतो प्रेयसीच्या रुपात,कुणी मैत्रिणीच्या..नाहीच काही झाले तर जोडीदाराच्या रुपात....झाले एकदाचे...मग काय, आनंदी आनंद!!असं नसतं.इथे सुरू होते देवाणघेवाण भावनांची,विचारांची,गुण-दोषांची..  ही असते, अकल्पित,अविश्वसनीय अशी घुसळण..या सर्व अग्निदिव्यातून अलगतपणे, तावून- सुलाखून,तळपत निघतं.. ते खरं प्रेम.. बऱ्याचदा दिखाऊ,वरकरणी, मुखवटा असलेलं,"सो कॉल्ड".. प्रेम,इथेच जळून जातं.. व संपूर्ण आयुष्य बेचिराख होऊन जातं. पण, जर समर्पणाची जोड मिळाली,तर याच प्रेमाला दिव्यत्वाची झळाळी प्राप्त झाल्या वाचून राहत नाही.एकमेकांविषयी आदर,आपुलकी, जिव्हाळा,या जगात अगदी फुकट मिळणाऱ्या गोष्टी, सहजीवनाला गर्भश्रीमंती मिळवून देऊ शकतात. कारण,दगडाचा देव जर प्रेमाचा भुकेला असतो तर हाडामासाच्या माणसाने कुणाचे घोडे मारलेत!!
                                               
(Courtesy:Unsplash-Everton Vila)

आयुष्यभर माणूस सैरभैर पळत  असतो.जबाबदाऱ्या,महत्वाकांक्षा, भौतिक सुख..यांचा ताळमेळ साधता -साधता त्याची पुरती दमछाक होते.बरेच जण ते साध्य करतातही.पण हे सर्व मिळवल्यावरही ते समाधानी असतात का??नक्कीच नाही.कारण त्यांना खऱ्या प्रेमाचा शोध लागलेला नसतो.व हा लागतो,तेव्हा आयुष्याची ती सोनेरी वर्षे काळाच्या पडद्याआड लुप्त झालेली असतात.मागे वळून पाहतांना,पश्चयाताप करण्यावाचून काही उरत नाही!!
   
(Courtesy:Unsplash-Harli Marten)

            प्रेमाला काळ, वेळ, वय,कशाचंही बंधन नसतं. प्रेम हे शाश्वत,निरामय,सुखदायी असतं. हे अस्सल,पवित्र,निरागस प्रेम ज्याला मिळतं,तोच खऱ्या अर्थाने सुखी,समाधानी!असे म्हणणे अतिशयोक्ती ठरणार नाही!!

Best of glocal marathi

गनिमीकावा

        गनिमीकावा संकटे बहु येतील, हरणे तुला ठाव नाही.. कोंडीत सापडाया, गड्या तू कुणाचा साव नाही..!!     भेटतील सरडे,      पदोपदी तुला रे.. ...