दगड, माती किंवा सिमेंट, विटांनी जोडलेल्या....कुडाच्या,मातीच्या व अगदीच सिमेंटच्या असल्या..तरी.... त्यांना भक्कमपणे जोडून ठेवतो....ओलावा मायेचा....रुसवे-फुगवे चालायचेच..दंगा-मस्तीही चालायचीच..हीच तर असते खूण जिवंतपणाची....नाहीतरी..मोठमोठाल्या हवेल्यात भुतं राहतात,हे ऐकतच आपलं बालपण गेलंय..।।
इथे असतात, आई वडिलांनी आणलेल्या खाऊसाठी भांडणारे....शाळेच्या ट्रीपला गेल्यास आवर्जुन एकमेकांसाठी काही ना काही आणणारे....मित्र नसतात ते मुळी एकमेकांचे....पण सतत साऱ्यांच्या मनी असतो एकच ध्यास....कुटुंबाच्या प्रगतीचा.. म्हणूनच कदाचित हे बंध मैत्रिपलीकडचे असतात...।।
![]() |
Courtesy:Unsplash-Dimitri Houtteman |
इथे असतात, आई वडिलांनी आणलेल्या खाऊसाठी भांडणारे....शाळेच्या ट्रीपला गेल्यास आवर्जुन एकमेकांसाठी काही ना काही आणणारे....मित्र नसतात ते मुळी एकमेकांचे....पण सतत साऱ्यांच्या मनी असतो एकच ध्यास....कुटुंबाच्या प्रगतीचा.. म्हणूनच कदाचित हे बंध मैत्रिपलीकडचे असतात...।।
![]() |
Courtesy:Unsplash-Liv Bruce |
इथे झटत असतो प्रत्येकजण,रक्ताचं पाणी करून..भविष्यातल माळरानं फुलवण्यासाठी..म्हणूनच तर अभिमानानं मिरवतो एकमेकांची जुनी पुस्तकं.. कापडं त्यांच्या ठिगळा सहित..शेवटी कापडाप्रमाणे नाती थोडीच असतात दिवसागणिक जुनी होणारी।।
![]() |
Courtesy:Unsplash-Jude Beck |
बाहेरच्यांनी साधं..काही बोलल्यास तिळपापड होतो..तेच मात्र घरच्यांनी बदडल्यास..चिडतो..रागावतो..व बरंच काही करतो..शेवटी विसरूनही जातो..खुन्नस मात्र बाहेरच्यांचीच..कारण त्याच चार भिंती देतात शाश्वती सुखाच्या चार घासांची..म्हणतात ना "कुणी जा म्हणणार नाही ,तेच तर असतं आपलं खरं घर"।।
![]() |
Courtesy:Unsplash-Jude Beck |
हे रेशमी बंध ,हा सच्चेपणा.. उरलाय कुठे..दिखाऊपणा, नाटकीपणाचा बीभत्स मुखवटा घेऊन वावरताहेत सगळे..चार भिंती तेव्हाही होत्या..आज रूढार्थाने अधिक भक्कम झाल्यात..मातीचा..भाकरीचा..जुन्या-फाटक्या पुस्तकांचा..कपड्यांचा..अस्सल गंध मात्र हरवलाय.. झालीय जणू निर्वात पोकळी..रुक्ष, निर्जीव..नात्यांची.. कुटुंबांची... ............ (कुटुंब)