![]() |
Courtesy:Unsplash |
![]() |
Courtesy:Unsplash-Olivier Guillard |
ग्रामीण भाग असो की शहरी,"राम,श्रीराम, तुकाराम, राजाराम, सखाराम...ई."नावांनी राम आपल्याला पदोपदी भेटत असतो."आयाराम-गयाराम"सारख्या प्रवृत्तीनाही राम नाम लावण्यास आपण कसूर केली नाही,हेही विशेष.सांगायचे तात्पर्य,राम नामाने आपले संपूर्ण भावविश्व व्यापलेले दिसते.
![]() |
Courtesy:Unsplash-Frank Holleman |
हा राम,"राजा की देव","आर्य की अनार्य","भारतीय की विदेशी"असल्या वादात न पडता,सामान्य माणूस त्याला "शेतात राबणाऱ्या शेतकऱ्यांत,मोलमजुरी करणाऱ्या कष्टकऱ्यांत,दीन-दुबळ्यांत"शोधतो.हा असतो महात्मा गांधींचा राम, जो त्यांनी समाजातल्या शेवटच्या व्यक्तीत पाहिला व रामराज्याचे स्वप्न आजन्म उरी बाळगले तसेच शेवटचा श्वासही "हे राम!!"म्हणत सोडला.
![]() |
Courtesy:Unsplash-Aman Upadhyay |
सामान्यांनी नेहमीच रामाला आदर्श व मूल्यांचे मूर्तीमंत प्रतीक म्हणून जोपासले आहे.राम म्हणजे,शबरीची उष्टी बोरे खाणारा,पक्षी,वानर,यांच्यात आत्मविश्वास जागवून त्यांच्या साथीने जगज्जेत्या रावणाशी लढणारा नायक,एक आदर्श राजा,पती,भाऊ,मुलगा.. ई.रुपात रामाची प्रतिमा प्रस्थापित झालेली आहे.ही आदर्श व मूल्ये आपण आचरणात आणण्यात कमी पडलो,हे मात्र नक्की.
![]() |
Courtesy:Unsplash-Nandhu Kumar |
आज कधी नव्हे एवढा राम नामाचा गजर होत असतांना..सर्व जाती,धर्म,पंथांना स्वीकारणारा "राम"जर आपण स्वीकारला नाही तर येणाऱ्या काळात मात्र आपल्या जगण्यात "राम"राहणार नाही,हेही तितकेच खरे!!!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा